Matthew Arnold

For the students of M. A. I (English), KBCNMU, Jalgaon, the given is the link of presentation regarding 'Matthew Arnold',
https://www.slideshare.net/JehanFM/matthew-arnold-preface-to-a-poem-by-jehan-almahmoud-pnu?qid=eb65f04d-d88f-48cc-b7b6-97dcfc26ecdd&v=&b=&from_search=12

Plato's Objection to Poetry and Aristotle's Defence

For the students of M. A. I (English), KBCNMU, Jalgaon, the given is the direct link of presentation on 'Plato's Objection to Poetry and Aristotle's Defence',
https://www.slideshare.net/dilipbarad/platos-objections-to-poetry-and-aristotles-answers?qid=a5aee4f0-2df1-485b-825e-6ee67592d8fa&v=&b=&from_search=8

An Apology for Poetry

For the students of M. A. I (English), KBCNMU, Jalgaon, the following is the link of presentation on 'An Apology for Poetry',
https://www.slideshare.net/AnamtaDua/an-apology-for-poetry-paragraph-130?qid=62934557-5c7c-4423-ad74-006126778b24&v=&b=&from_search=2

Sudha Murthy

For the students of M. A. II (English), KBCNMU, Jalgaon, the given link is of presentation on 'Sudha Murthy',

https://www.slideshare.net/vandanatp/sudha-murthy-study-as-a-novelist?qid=bdbf6dff-e632-4933-b870-376c4b8796c4&v=&b=&from_search=4

Rabindranath Tagore

For the students of M. A. II (English), KBCNMU, Jalgaon, the following is the link of the research paper on 'Rabindranath Tagore' ,
https://www.slideshare.net/DrPBhadury68/criterion-rabindranath-tagore-a-reappraisal-of-his-universality-and-relevance?qid=b762f1ee-ee29-434a-b72f-b402afa97f33&v=&b=&from_search=10

Indian English Poets

For the students of M. A. II, KBCNMU, Jalgaon, the given is the link of presentation on 'Indian English Poets',
https://www.slideshare.net/malik6198/study-of-indian-english-poet?qid=8cdae8e9-6ba9-421d-bd56-e1e45981679a&v=&b=&from_search=5

Chetan Bhagats Works

For the students of M. A. I (English), KBCNMU, Jalgaon, following is the link of the presentation on 'Chetan Bhagats Works',

Chetan Bhagat

For the students of M. A. I, KBCNMU, Jalgaon, the following is the direct link of the presentation on 'Chetan Bhagat',

https://www.slideshare.net/prachivaraiya/prachippt?qid=c9fe0dd0-02cb-435a-857b-e05eea6550e6&v=&b=&from_search=3

Night of the Scorpion

For the students of M. A. II, KBCNMU, Jalgaon, the shared is the link of presentation on 'Night of the Scorpion',
https://www.slideshare.net/ayishuu/night-of-the-scorpion-8b?qid=26c229de-8135-49ba-8a2d-6aa8e92ea6e5&v=&b=&from_search=5

Goodbye Party for Miss Pushpa T S

For the students of M. A. II ,KBCNMU, Jalgaon, the given link is regarding the presentation on   'Goodbye Party for Miss Pushpa T S',
https://www.slideshare.net/ShreyaSanghvi/ppt-42457770?qid=26c229de-8135-49ba-8a2d-6aa8e92ea6e5&v=&b=&from_search=3

Indian Writers in English

For the students of M. A. II , KBCNMU, Jalgaon, the given is the direct link for the presentation on 'Indian Writers in English',
https://www.slideshare.net/sdohameb/indian-english-writing?qid=64bc92eb-5b6e-4a8e-8640-8fe003411764&v=&b=&from_search=9

Indian Writing in English

For the students of M. A. II, KBCNMU, Jalgaon, the following is the link of presentation on 'Indian Writing in English',
https://www.slideshare.net/milan1994/introduction-to-indian-writing-in-english-preindependence?qid=64bc92eb-5b6e-4a8e-8640-8fe003411764&v=&b=&from_search=12

Wordswoths theory

For the students of M. A. I (English) , KBCNMU, Jalgaon, the given is the direct link for the presentation on Wordswoths theory,
https://www.slideshare.net/BhartiDharaiya/literary-criticism-and-theory-180432890?qid=424a6057-75a2-4891-b025-0f39330d26d5&v=&b=&from_search=3

Tradition and Individual Talent

For the students of M. A. I (English), KBCNMU , the following is the link for the research paper regarding T. S Eliot's Tradition and Individual Talent,
https://www.slideshare.net/ijsrneteditorial/t-s-eliot-and-the-concept-of-literary-tradition-and-the-importance-of-allusions?qid=e381799e-9dbb-406f-8d59-6ace24cd2d86&v=&b=&from_search=8

Catharsis

For the students of M. A. I , Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon , the given is the link of presentation on Catharsis,
https://www.slideshare.net/shuckabe/huckabee-greek-tragedy-introduction-and-padlet?qid=52534e79-83da-4150-ac8a-a957e55d989d&v=&b=&from_search=3

Imitation by Aristotle

For M . A. I students , Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashta University, the following is the presentation on the topic 'Imitation by Aristotle',
https://www.slideshare.net/shuckabe/huckabee-greek-tragedy-introduction-and-padlet?qid=52534e79-83da-4150-ac8a-a957e55d989d&v=&b=&from_search=3

Take Diversion

'Take Diversion'


सध्या अशा प्रकारच्या पाट्या आपल्याला रस्त्यावर नजर पडेल तिकडे दिसत आहेत . मुळात रस्ता हा रस्ता  म्हणून राहिला नसून फक्त Diversions तितके तिथे दिसत आहेत . आमच्या यथाकथित 'सुंदर , सुव्यवस्थित या सुरक्षित ' शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर फ्लायओव्हरच्या कामामुळे जागोजागी असे Divert करणारे रस्ते अतिशय चांगल्या स्वरूपात बघायला मिळतील . त्यात तेथून प्रवास करतांना जणू काही 'Heaven on Earth' ची प्रचिती यावी . तो रस्त्यांचा नाजूकपणा ; ती धूळमिश्रित शुद्ध हवा , जिचा आस्वाद घ्यायला आजकाल सामान्य माणूस हपापतो , अप्रतिमच म्हणायचं .

या रस्त्यांचा आणखी एक अतिमहत्त्वाचा उपयोग म्हणजे आमचे Physiotherapy चे पैसेही वाचतात . थंडीच्या दिवसात हात - पाय दुखणाऱ्या , वाताचे वरदान लाभलेल्या 'रंजल्या - गांजल्या ' लोकांचे अतिउत्कृष्ट प्रकारचे व्यायामप्रकार मोफत होतात . दर्जेदार असे 'Acupressure ' मिळते .

शिवाय आमच्याकडील काही भागांतील प्रथा तर तुम्हांला माहीतच नाही . ऑटोत ६ ते ७ जण जमल्याशिवाय आम्हांला रस्ता दिसत नसतो . फक्त चार लोकांना बसवून स्वारी करणे , छे ... इतकं तुच्छ , निकामी समजता की  काय तुम्ही ? आमच्या Reputation च काय ?  अखेर आमची महान परंपरा हो ती ! तर अशा ६ -७ 'जीव मुठीत घेऊन ' बसलेल्या लोकांच्या मैत्रीपूर्ण सान्निध्यातून आमचा प्रवास होतो . कुणाचा हात तिरपा होतो , कुणाचा तर पाय ओढल्या जातो . पण आम्ही खरं म्हणजे मुळातच सहनशील माणसं . याबाबतीत खरतरं दैवी कृपाच आहे आमच्यावर म्हणायची .

मांडीवर बसवून घेण्याची प्रथाही आमचीच बरं . Adjustment म्हणून आम्ही हे प्रयोग रोजच करतो . कारण लवकर निघण्यापेक्षा आनंद तो कोणता असतो ? केव्हा केव्हा तर Overloaded Truck एखाद्या पडक्या पुलावरून जातोय , तेव्हा त्याची जर तो पूल एक मनुष्य असता तर काय अवस्था असती , असे विचार गुटगुटीत बालक मांडीवर बसल्यावर येतो , साहजिक आहे . त्यात रस्त्यावर जे गोल , गोंडस असे छान खड्डे आहेत , ते तर अगदी चंद्रावरील डागांसारखे दिसतात . अविभाज्य घटक आहे तो आमच्या रस्त्यांतला . मुळात रस्त्यात खड्डे आहेत कि खड्ड्यात रस्ते हे महाभयंकर Sphinx चं कोडं आम्हांला काही सोडविता येत नाही बुवा ... असो ... शेवटी आपले मन Divert करून प्रवास करणे याशिवाय या Diversions नी काही पर्याय तरी सोडला आहे का ?

एक काळरात्र ठरलेली सकाळ

एक काळरात्र ठरलेली सकाळ

कोण म्हणतं की हरण्यात पुरुषार्थ नाही ? 'पानिपत ' अशा पराभवाची कहाणी आहे , ज्यात स्वयंभूना , मर्दांना जिंकण्याचीही गरज नसते हे दिसून येते . 'हारकर भी बाजी जितनेवाले को बाजीगर कहते है ।' हे विधान विनासायास नव्हे . जर विजय होऊनही अब्दाली आमच्या मायकडे परत बघण्याची दृष्टीही आणू शकला नाही , तर यापेक्षा वेगळा 'विजय ' तो कोणता ? जर आजही उत्तर भागात अब्दाली , नजीब यांच्या कथांऐवजी सदाशिव भाऊंवरील पोवाडे गायले जातात , तर यापेक्षा 'विजय ' तो काय असतो ? अख्ख हिंदुस्थान हातात घेण्यासाठी आलेल्या घुसखोरांच्या मक्तेदारीऐवजी 'भाऊपूर' हे गाव वसतं  , यापेक्षा मोठा 'विजय ' तो कोणता ?

कटकारस्थानं करणाऱ्या विरोधी माणसांच्या त्या वणव्यात , जिथे साक्षात प्रकृती आपल्या विरोधी होती , तेथे लाचार आपण काय करणार होतो ? दक्षिणायनानंतर सूर्याच्या स्थितीतील स्थित्यंतरे ; पालापाचोळाही ज्यांच्या नशिबी नव्हता ती जनावरे आणि सर्वांत भाग्यवान म्हणजे आमची पाण्यावर जगणारी , उपाशी असणारी फौज त्यात मांसाहारही रास नसणाऱ्या आमच्या माणसांना सहन करावी लागणारी मृतदेहांची दुर्गंधी ; त्यातून शरीर काय मनही क्षीण करणारे रोग ; गारठवणाऱ्या थंडीत त्यासाठी पूर्णपणे सज्ज असणाऱ्या फौजेविरोधी , तिची थोडीही सवय नसणारे , अपूर्ण वस्त्रातले आपले सैन्य काय कल्पना होती की , निसर्गही बेईमान होईल .

आपलं घर , बायका पोरं यांची चिंता डोक्यात घेऊन रणांगणावर अर्धे सैन्य आडवं पडल्यावर जी मनाची घालमेल होत असेल , विचार तरी करवतो का ? १४ जानेवारी १७६१ चा तो 'संक्रांतीचा ' दिवस महाराष्ट्रातील सर्व घरांवर काळ्या छायेसारखा अशुभ ठरला . काय करायला हवे होते , नको होते , याचा विमर्श करण्यात आता अर्थ नाही . पण हे बलिदान अर्थशून्य नव्हतेच . अर्धी सेनाही नसतांना निधड्या छातीने सामोरे जाण्याचे धाडस फक्त मराठी माणूस करू शकतो , हे जगमान्य झाले ते या लढाईने .
'कोण म्हणतं पानिपत काही देऊन गेलं नाही ,
हारुनही दिमाखात आठवल्या जाण्याचं भाग्य पानिपतात आहे !'

कधीकधी हरणं माणसाला जिंकण्यापेक्षा महत्वपूर्ण ठरतं , कारण त्यातून जो अनुभव मिळतो , तो मौल्यवान असतो .
'रणांगणावर जरी आपलं पानिपत झालं ,
बाहेरचा रस्ता दाखविण्याचं कसब आपल्या सगळ्यांत आहे .'

आपल्याच मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान देण्याची तयारी असणाऱ्या शूरवीरांनाच वीरगती प्राप्त व्हावी , याला सुदैव कि दुर्दैव  हेच कळत नाही . असो ... पानिपतची ती भूमी पावन झाली ती आपल्या शूरवीरांच्या कर्तृत्ववान रक्ताने , या लढाईनेच आपल्याला विपरीत अशा परिस्थितीतही हार न मानायला शिकविले .

एखाद्या जिंकलेल्या लढाईपेक्षाही एखादी हरलेली लढाई माणसाला कशी जिंकायला शिकवितो किंबहुना प्रवृत्त करते , यापेक्षा विलक्षण व अदभूत तरी काय असतं ? अख्ख्या इतिहासात अशी काळरात्र ठरलेली 'सकाळ' नसेल, तरी तिच्या वीरगाथा गेल्या जाव्यात , हे स्वतःमध्ये एक आश्चर्य आहे .

नशीब हे काय असत किंवा काही गोष्टी कशा आपल्या हातात नसतात याचा उत्तम दाखला 'पानिपतने ' जणू दिला. सगळ्या बाबी जरी विपरीत होत्या किंबहुना झाल्यात तरीही  आजही तेथील सन्मानार्थ उभी ठाकलेली शिळा आपल्या उत्तुंग यशाची साद देते ,
'वीरमरण व्यर्थ जाण्यासाठी नसतं ,
ते कधीही असामान्य असतं ! '
पानिपतची आठवण व ती संक्रांत आपल्याला हे शिकवून जाते .

पानिपतमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या हार एक स्वातंत्र्याच्या शिलेदाराला मनाचा मुजरा ... 

वर्तमान समाजाची विषण्ण दशा !

वर्तमान समाजाची विषण्ण दशा !


काय झाले आहे आजच्या युगाला ,
अनेक समस्यांचा विळखा बसलाय या देशाला !

परिस्थिती बघता आजची , डोळ्यांत येते पाणी ,
उघडपणे होत आहे समाजाची हानी !

जन्माला येण्याआधी छाटल्या जातात कळ्या ,
पण नाही बसत अशा हातात हथकड्या !

जिथे तिथे बघायला मिळतो स्वैर भ्रष्टाचार ,
आणि आम्ही देतो अशा पापांना आधार !

दंगे , बॉम्बस्फोट , कत्तली यात समाज बरबटलेला आहे
मनुष्य पशुपेक्षा  वाईट बनत चाललेला आहे !

येथे देश करतो आहे नवतरुणांकडून आशा ,
व्यसनाधीन तरुणाई करते आहे फक्त निराशा !

लोकसंख्येचा भस्मासूर जातो आहे वाढत ,
गरिबांची होते आहे दिवसेंदिवस वाईट हालत !

नवी पिढी किती मदमस्त होते आहे आज ,
आईबापाला सांभाळण्याची वाटत आहे लाज !

अशा नव्या चंदेरी दुनियेत जगत आहे मनुष्य ,
आपल्या जुन्या संस्कारांना करतो आहे अदृश्य !

एकविसाव्या शतकाच्या नव्या पर्वात जगतोय आम्ही ,
स्वतःच्याच तोंडाला काळीमा फासतोय आम्ही !

कशी मिळेल अशाने जगण्याची दिशा ,
समाजाची होते आहे विषण्ण दशा !

विचारसरणी

विचारसरणी


आजकाल जो तो आपली यथाकथित विचारसरणी मांडण्याच्या, थोपण्याच्या नादात जगत आहे. विचारसरणी ... शब्दचं किती भारदस्त. खरं म्हणजे इतक्या गाज्यावाज्यात प्रदर्शन करण्यासाठी वापरण्यायोग्य हा शब्द नाही. तितकाच अगदीच दुर्लक्ष करून त्याची बेइज्जती करण्यासारखाही हा शब्द नाही. आज प्रत्येक माणूस या शब्दाच्या व्यसनात म्हणा, गराड्यात म्हणा, पार फसलाय. 

'Turning and turning in a widening gyre', W. B. Yeats च्या 'Second Coming' मधील ओळीची आठवण झाली . एका फार पोकळ अशा जगात जणू आमची ही विचारसरणी आम्हांला नेवून ठेवते आणि आम्ही मात्र असं भासवतो की जणू एखाद्या प्रगाढ शास्त्राची निर्मितीचं आम्ही करतोय की काय !

Aristotle ला Fine Art चा जितका गवगवा नसेल, तितका तो आम्हांला आमच्या प्रतिबद्ध विचारसरणीबद्दल असतो . 

यातून निर्माण होते ती समाजातील स्पर्धा, विचारसरणीच्या अर्थाचा विपर्यास, आपापले रंग, विचार, झेंडे घेऊन रस्त्यावर माणूसपणाला हसविणारे किंवा रडविणारे कृत्य करून मग आम्ही वातानुकूलित खोलीत बसून माणूसकीला कशी आमची विचारसरणी योग्य मार्गदर्शन करते, ते सांगतो. उपहासात्मक वाटत नाही का ?
मला तरी वाटते, माणसाचे भले व्हावे, विचारशक्ती वाढावी म्हणून या अतिशय विचारवादी गोष्टींचा जन्म झाला, किंबहुना व्हावा. पण जर आज याच विचारांमुळे विचारांना बंधन मिळत असेल, एकसुरीपणा, रटाळपणा, 'रोबोटिकी 'करण होत असेल, तर ते विचार 'विचार' म्हणावेत का ?

एका विचारासाठी दुसऱ्या विचारावर आंधळेपणाने टिपणं करणे, बोटं लावणे किती शिक्षितपणाचे लक्षण आहे ? मग मुळात आम्ही शिक्षित झालो आहोत का ? एक माणूस म्हणून प्रत्येकाला ज्याची त्याची जागा मिळायला हवी, विचार हवेत, ही गोष्ट फक्त पुस्तकी विचार बनत असेल तर त्याचा काय अर्थ ?

मुळात विचारसरणीच्या मागे डोळे झाकून का रहावे ? कारण ही गोष्ट जन्माला घालणे हे मानवीच कृत्य आहे. कुणीही माणूस जर परिपूर्ण नाही , तर त्याचे विचार परिपूर्ण कसे असतील ? असले तरी त्याचा वापर तो त्याच काटेकोरपणे करेल याची शाश्वती देणारा हरिश्चंद्र या युगात मिळेल का ? मग जर प्रत्येक विचार माणसाप्रमाणे पूर्ण नाही, तर त्यामागे आपलं चालतं डोकं बंद करून मिरविण्यात काय माणूसकी ?

याचा अर्थ असाही नाही की विचारांची गरज नाही. 'विचार हवेत, मात्र त्यांच्या धारा चाकू, सुरीप्रमाणे नकोत, की ज्यामुळे माणूसकीचे सगळे दोरखंड छाटून पडायला व्हावेत.'

जरी प्रत्येक विचार परिपूर्ण नसतो, तरी तो अर्थहीनही नसतो. मग आता गरज आहे, चांगल्या गोष्टी घेऊन त्यानुसार जगायची. एकाच गोष्टीमागे लागून स्वतःला बंधनात ठेवण्यापेक्षा सगळीकडून चांगलं घेऊन काहीतरी सर्वोत्तम घडण्यात, घडविण्यात काय वाईट आहे ? यामुळे सर्वांत चांगली ही गोष्टही घडेल की, आपापल्या वर्तुळात राहणाऱ्या लोकांच्या यथाकथित 'society' म्हणविल्या जाणाऱ्या खोट्या, मिथ्या, भ्रामक घटकाला छेद मिळून खऱ्या अर्थाने 'समाज ' बनेल . 

जेव्हा माणूस एखादा विचार जोपासतो, तो त्याला शरण जातो, तो आपल्याच विचारांशी मिळत्याजुळत्या लोकांशी समरसून राहतो, पण बाकीच्या लोकांशी मात्र त्याचे हाडवैरच निर्माण होते. मग समाजात 'गट ' बनतात.  गटांगटांतून 'समाज 'निर्माण झालाय, इतिहास हेच आपल्याला सांगतो. मात्र आता परत 'समाजा 'तून 'गटे ' निर्माण होत आहेत . आपल्यापेक्षा तर आदिमानव 'sapien' होता म्हणजे !गटांतून एकजिनसी समाज निर्माण होऊ शकत नाही, ही एक मोठी शोकांतिका आपण एखाद्या विचारधारेमागे राहून विसरतो. एखादी विशिष्ट विचारसरणी जोपासणे, हा महाभयंकर रोग आहे. विचारसरणीचा जन्म माणसाला सुसंस्कृत करण्यासाठी झाला, मग हे कोणते 'सुसंस्कृतीकरण ' सध्या चालतंय  असे म्हणायचे ?

मग हे टाळण्यासाठी सगळ्यांच्या ताटामधून थोडं थोडं अन्न घेतलं, तर किती छान आहार बनेल, त्यातून किती छान सकस आरोग्य बनेल. समाजाच्या सुयोग्य आरोग्यासाठीही हेचं लागू होतं. 
'एकमेकां साहाय्य करू,
अवघे धरू सुपंथ ... '
ह्या ओळी उगाचच नाही म्हटल्या गेल्यात पण याला खऱ्या अर्थाने राबविणे गरजेच बनलंय सध्या. मुळात विचारसरणीमुळे तुकडे करून घेण्यापेक्षा तुकड्यां-तुकड्यांमधून एकत्र राहण्याची, एकमेकांना न दुखविण्याची अवाच्य, अलिखित विचारसरणी जर आपण आत्मसात केली, तर काय वाईट आहे ?

विशिष्ट विचारसरणीचा सर्वांत वाईट परिणाम तरुणांवर होतो. विचारसरणीला कधीच हे पोट, ज्यासाठी सगळे उद्योग चालतात, किंबहुना चालायला हवे; दिसत नाही. उलट या विचारसरणीच्या उगाचच्या उद्योगांमध्ये लागल्यावर करायला हव्या, अशा गोष्टींची, उद्योगपाण्याची आम्हांला आठवण तरी होते का ? ती खोटी झिंग नशेप्रमाणे नसांनसांत भिनते आणि तरुणवयात जे करायला हवे, ते सर्व बाजूला राहते. बिना नशापानाची 'उडता पंजाब ' सारखी स्थिती आमची होते. कारण रक्त कोवळं आहे, तरुण आहे, त्यामुळे वाईट प्रवृत्तीचा संसर्ग व्हायला वेळ लागत नाही. त्यातून मग निर्माण होतात विनाकारणाचे, विचित्र प्रश्न ... ज्याचे उत्तर मिळणे रोजगार मिळण्यापेक्षा जटिल बनतं आणि याच 'भुलभुलैय्या'त आजचा तरुण आपले जीवन दान करतो. फलनिष्पत्ती काय तर खोटी आशा, भरकटलेली, यात दडपल्या गेलेली, बर्बाद झालेली तरुणाई ...

आणि मग एक संघर्ष सुरु होतो, जो निष्कारण, अव्याहत,अनिर्बंध निराश काळासाठीचा असतो. आपल्या विचारांची सुधारणा करण्यासाठी जोपासलेली विचारसरणी आपल्या 'विचारकैदी ' बनविते आणि हळूहळू 'विचारशून्य'ही ... 

समजदारी

समजदारी

समजदारी , मुळात ही असते कुणाची तरी मक्तेदारी ,
लोकांप्रमाणे चाललो तर आपण समंजस ,
' हुकूम मेरे आका ' म्हटलं तर आपण समंजस ... 

बर समंजस आपणच असावं ,
लोकांच्या अपेक्षांसाठीही आपणच झुरावं ... 

आपण कितीही समजून घेतलं तरी हे लोक समजून घेत नाही ,
एकदाही जर ऐकलं नाही तर ' नासमज ' हा ठपका कधी ठेऊ म्हणून त्यांना झोप लागत नाही ... 

माणूस अपेक्षा करतो दुसऱ्याच्या समंजसपणाच्या अतोनात काहीबाही ,
मग काय हा नासमजपणा नाही ?

कुणी समंजसपणाचा ठेका घेत नसतो ,
परत परत माणूस जास्त सहन करत नसतो ,

तरी का येते मग वागण्यात मक्तेदारी ,
आणि मग आपलीच गृहीत धरल्या जाते समजदारी ... 

इतकं समजून झालंय की समजून घेण्याची भीती वाटते ,
या खोट्या नांवाखाली कुणाचा गुलाम होण्याची भीती वाटते ...

या ' समजदारीलाच ' बनवलंय माणसाने हत्यार ,
आणि मग भक्ष्य बनतो असाच एक ' समजदार ' ,

असो ,
नेहमीच या जगात समजदार बनून चालत नाही ,
हे कलियुग आहे ,
येथे वाल्याचा वाल्मिकी होत नाही !

जीवन...

जीवन... 

जीवन ,

जणू एक भयाण रखरखतं वाळवंट ,

कधीही न संपणारा उदास उन्हाळा ,

अनिश्चित काळासाठीचा वनवास ,

सुनिश्चितआहे तो फक्त वेताळासारखा मानगुटीवर बसलेला हा प्रवास ,

परत न घेता येणारा शाप ,

आपल्याच हातून आपला विपर्यास ,

मृगजळाच्या शोधात माणूस झालेला भकास ,

सद्सदविवेकबुद्धी , शांती जणू होते लंपास ,

निश्चित दिशा कधीही न दाखविणारा कंपास ,

बस ग्रे छटांचा हा भलामोठा कॅन्व्हास ,

लोकांची गर्दी ही महान ,

आपलाच मेंदू राहतो गहाण ,

एक तडफडत ठेवणारा विषाचा प्याला ,

बांधील आहे आत्मा शरीराला ,

आपणच घोटतो स्वतःचा गळा ,

संताप , उद्विग्नता आपणच गिळा ,

कित्येक विविधरंगी सुंदर स्वप्न ,

प्रत्यक्षात मन झालयं फक्त भग्न ,

डोळ्यांत आणते कित्येकदा पाणी ,

कुठे खरी असते स्वप्नातील कहाणी ...  

The Godfather

For the students of M. A. I, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, the given is the link to download ebook ' The Godfather',
https://www.pdfdrive.com/godfather-01-the-godfather-e194597362.html

The Rise of Sivagami

For the students of M. A. I, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, the given is the link to download the ebook 'The Rise of Sivagami'

Asura : The Tale of Vanquished

For the students of M. A . II , KAvayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, the following is the link for downloading the ebook 'Asura : The Tale of Vanquished',
https://www.pdfdrive.com/asura-tale-of-the-vanquished-the-story-of-ravana-and-his-people-e42846385.html

Sita : An Illustrated Retelling of the Ramayana


 For the students of M.A. I, Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon, the following is the link to download the ebook 'Sita : An Illustrated Retelling of the
Ramayana'.
https://www.pdfdrive.com/sita-an-illustrated-retelling-of-the-ramayana-e199643193.html

यहाँ सब बिकता है।


यहाँ सब बिकता है। 


शिक्षा के कागजों से लेकर नौकरी तक ,
यहाँ सब बिकता है।
दिखावें की दोस्ती से लेकर शादी के लिए लड़की तक,
यहाँ सब बिकता है।
सपनों से लेकर सच्चाई तक ,
यहाँ सब बिकता है।
नियमों से लेकर कानून तक ,
यहाँ सब बिकता है।

यहाँ तक तो क्या ,
रिश्तें भी बिकते है ।
अपने भी पराये हो जाते है।
अगर मनचाही बात ना हो ना साहब ,
तो सबसे पहले यही हमे मात दे जाते है।
अरे दुश्मनों की क्या जरुरत ,
जब अपने ही धोखा दे जाते है।

क्या इस मोहमाया मे अच्छाई की कोई राह नही है ,
क्या इस झूठ के समंदर मे सच्चाई की कोई नांव नही है।
क्या इस स्वार्थ से लथपथ दुनियाँ मे अपनों का कोई आँगन नही है।
क्या इन पत्थरदिलों मे कोई इंसान खरा सोना नही है।

नही साहब ,
ये बस ऐसी एक दुनियाँ है ,
जहाँ सब बिकता है।
ये जो सब चीजें है, बस एक दिखावा है ,
क्योकि हम वहाँ रहते है ,
जहाँ सब बिकता है। 

प्रवास ...

प्रवास ... 



प्रवास ,

कधीही न थकणारा , अविरत , अखंड , अटळ , अलिखित , अद्वितीय , अनुभवसंपन्न , अभिलाषी , अविनाशी , अलौकिक ...
ज्याचा त्याचा , ज्याच्या त्याच्यासाठी ...

लगेच मोक्ष मिळेल असा कुठं असतो प्रवास ?
कधीही न सुटणाऱ्या स्फिन्क्सच्या कोड्यासारखा असतो जीवनाचा प्रवास ...

दिवस - रात्र , ऋतुमान यांसारखा ठराविक ही कुठं असतो प्रवास ,
अनपेक्षितांची अखंड साखळी घेऊन येतो तो जीवनाचा खरा प्रवास...

गणित , रसायनशास्र यांसारखी निश्चितता त्याच्यात नाही ,
कधीही उफाळून येणाऱ्या लाटेसारखा आहे हा जीवनाचा प्रवास...

हा काही तास , दिनांचा नाही ; तर जन्मभराचा आहे ,
आणि तुम्ही आम्ही जिवंत प्राणी खरे प्रवासी आहोत ...


जीवनाच्या प्रवासाला तुम्हांला कुठं जावं लागतं नाही ,
तुमचा कण - कण , क्षण - क्षण तो प्रवास अविरतपणे करत आलाय , करतोय ...

इथे कुणाचा सहवास लाभो न लाभो , प्रवास अटळ आहे ,
इथे कुणाची साथ भेटो न भेटो , प्रवास अविरत आहे ...

जन्म व मृत्यू या दोन ध्रुवांमधलं जग आहे प्रवास ,
सत्य आणि असत्य यातील दुवा आहे प्रवास ...

असा हा प्रवास दिवसागणिक वाढतो ,
तीळ - तीळाने , कणा - कणाने आणि माणसाला अनुभवसंपन्न बनवितो ...

खरं म्हणजे जीवनाची आस आहे प्रवास ,
साध्यापेक्षा खास आहे प्रवास !

जन्म व मृत्यू या दोन ध्रुवांमधलं जग आहे प्रवास ,

इंटरनेट के ज़माने में...

इंटरनेट के ज़माने में... 

बचपन गुम गया साहब ,
इंटरनेट के ज़माने में। 
किताबों से दूर हो गए साहब ,
इंटरनेट के ज़माने में। 

कहाँ गया वह घर गोकुल जैसा ,
कहाँ गया वह आँगन ,
अब तो सहमें हुए एक कमरे मे रहते है ,
इंटरनेट के ज़माने में। 

कहाँ गए वह बच्चों के खेल ,
कहाँ गए वह फुरसत के दिन और रैन ,
अब तो अकेले रहते है साहब ,
इंटरनेट के ज़माने में। 

अब तो सबसे दूर हो चुके ,
अब तो खुद से दूर हो चुके ,
जाने कब चैन पाऐंगे ,
इंटरनेट के ज़माने में। 

माणसाची गोष्ट ...

माणसाची गोष्ट ... 

एका विचित्र , भयाण भविष्याच्या कल्पनेकडे नेण्याचं काम कोरोनान केलंय . ज्याला त्याला आपल्या पिंजऱ्यात कैद करण्याची ताकद ठेवणारा मनुष्य आज हतबल झालेला, होतांना दिसला , कदाचित पहिल्यांदाच आणि हे दुर्दैवी वास्तव निसर्गनिर्मित आहे का मनुष्याची करणी ते तर विधात्यालाचं ठाऊक . तरी धोका कारणामागे लपेल कसा ?

निसर्गनिर्मित असल्यास भविष्यात माणसाने निसर्गाला गृहीत धरू नये असा सल्ला जणू माणसाला मिळालाय . मात्र मानवनिर्मित असेल तर स्थिती त्याहून वाईट , कारण मनुष्य निसर्गाइतका समजूतदार नाही , असता तर कदाचित आज हे अघटित घडलंच नसतं .

एक गोष्ट निश्चितपणे यातून शिकायला मिळते , ती म्हणजे जरा जास्तचं शिकलेल्या , अतिशहाण्या या माणसाला अजूनही शहाणपणाची गरज आहे तीही निसर्गराजाकडून . स्वतःच्या शहाणपणात इतका  काय भारावून गेला कुणास ठाऊक , ज्याला स्वतःच्या अस्थित्व व अंताचा ठावं नाही तो अमर्याद , अथांग सृष्टीच्या नियमावलीत ढवळाढवळ करायला निघाला . आपल्यात असं वागण्याची सवय आहेच माणसाला , पण तो आता मर्यादा ओलांडतोय .

निसर्ग जितका सोज्वळ , समजूतदार आहे , वेळ आल्यावर शंकराप्रमाणे तांडवही करू शकतो याची प्रचिती जणू मिळतेय . अजूनही वेळ गेली नाहीये . माणसानं त्याच्या दिलेल्या हद्दीत रहावं यातच त्याची भलाई आहे . 'खतरो के खिलाडी ' दूरदर्शन संचावरचं शोभतं , खऱ्या जीवनात मनुष्य प्रकृतीला टक्कर देऊच शकत नाही . तसा गोडं भ्रम करणे माणसाचा धादांत मूर्खपणा आहे . 

आठवणी ...

आठवणी ... 

आठवणी... 
परीसस्पर्श जणू ,

आठवणी... 
शिशिरातील इंद्रधनू ,

आठवणी... 
पावसाळयातील चकोर ,

आठवणी... 
आश्विनातील चंद्रकोर ,

आठवणी... 
 स्नेहांचं पंचपक्वान्न ,

आठवणी...
करी आयुष्य भावपूर्ण संपन्न ,

आठवणी... 
मंदिरावरील शोभिवंत कळस ,

आठवणी... 
अंगणातील पवित्र तुळस ,

आठवणी... 
भावनांचा अविस्मरणीय मेळ ,

आठवणी... 
विचारांचा गुंतागुंत खेळ ,

आठवणी... 
नाविन्याची आस ,

आठवणी... 
परत परत होणारे सुंदर भास ,

आठवणी... 
रात्रीस पडलेले सुरेख स्वप्न ,

आठवणी... 
माणसाला करते मंत्रमुग्ध मग्न ,

आठवणी... 
कधी डोळ्यांत आणते पाणी ,

आठवणी... 
का अपूर्ण असते प्रत्येक कहाणी ?

Raindrops...

Raindrops...

Oh, what to say about raindrops,
nectar for the crops,
taking away farmers sob,
making hares to hop !


Oh, what to say about raindrops,
minds are going on drive,
giving dream to live,
and helping us to survive !


Oh, what to say about raindrops,
creating heaven on earth, 
such a pretty thing,
making this life worth !


Oh, what to say about raindrops,
always like a secret treasure,
and there is no boundary,
for happiness to measure !


Oh, what to say about raindrops,
it's nature's valuable gift,
and our mind takes 
from worries, a shift !


Oh, what to say about raindrops,
I wonder what a wonder,
 I want to be a child again,
when I hear thunder !

अजिंठा . . .

  अजिंठा . . .  अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...