समजदारी
समजदारी , मुळात ही असते कुणाची तरी मक्तेदारी ,
लोकांप्रमाणे चाललो तर आपण समंजस ,
' हुकूम मेरे आका ' म्हटलं तर आपण समंजस ...
बर समंजस आपणच असावं ,
लोकांच्या अपेक्षांसाठीही आपणच झुरावं ...
आपण कितीही समजून घेतलं तरी हे लोक समजून घेत नाही ,
एकदाही जर ऐकलं नाही तर ' नासमज ' हा ठपका कधी ठेऊ म्हणून त्यांना झोप लागत नाही ...
माणूस अपेक्षा करतो दुसऱ्याच्या समंजसपणाच्या अतोनात काहीबाही ,
मग काय हा नासमजपणा नाही ?
कुणी समंजसपणाचा ठेका घेत नसतो ,
परत परत माणूस जास्त सहन करत नसतो ,
तरी का येते मग वागण्यात मक्तेदारी ,
आणि मग आपलीच गृहीत धरल्या जाते समजदारी ...
इतकं समजून झालंय की समजून घेण्याची भीती वाटते ,
या खोट्या नांवाखाली कुणाचा गुलाम होण्याची भीती वाटते ...
या ' समजदारीलाच ' बनवलंय माणसाने हत्यार ,
आणि मग भक्ष्य बनतो असाच एक ' समजदार ' ,
असो ,
नेहमीच या जगात समजदार बनून चालत नाही ,
हे कलियुग आहे ,
येथे वाल्याचा वाल्मिकी होत नाही !
No comments:
Post a Comment