हमारे गुनहगार हम खुद हैं,
तो किसी और को हम क्या ही सज़ा दे...
कौन कहता है के बस आसमान मे ही तारे होते है
जब आप जैसे दोस्त हमारे साथ होते है।
तब जमीन पर भी बेशुमार सितारे होते है।
निसर्गाची गुगली ...
आजकाल निसर्गाच्या मनात काय असतं, ते स्वतः निसर्गालाही माहित नाही. आज किती गारवा असेल आणि उद्या त्याचं रूपांतरण उकाड्यात कोणत्या गतीने होईल, याचा विचार कदाचित निसर्गालाही करता येत नाही. सध्या एखाद्या मातब्बर गोलंदाजाने 'गुगली' टाकून विषयचं संपवावा, तशाच प्रकारे जणू निसर्ग सगळ्यांना बाद करण्याच्या मार्गावर आहे.
अगदी मागील आठवड्यात सगळीकडेच थंडीची लाट होती. मागच्या दोन दिवसांपासून ती ओसरून अचानक खूपच उबदार ऊन जाणवले. लगेच कालपासून अचानक 'गुगली' टाकून माणसाची 'विकेट' पाडणारी थंडी पडलीय. अशा वातावरणामुळे थेट सगळ्या घरांत एक तरी व्यक्ती आजारपणामुळे 'आउट' होत आहे.
पण या प्रकाराला मनुष्य स्वतःच जबाबदार आहे, कान धरुनही जर त्याला सुधारायचेच नसेल तर निसर्गालाही दोष देवून काय उपयोग? तरी त्याने माणसाला खूपच समजून घेतले आहे. बऱ्याच संधी दिल्या आहेत पण मनुष्य काही समजावून सांगण्याच्या योग्य नाही, हे त्यानेचं त्याच्या कृत्यावरून बऱ्याचदा दर्शवून दिले आहे. म्हणूनच आता निसर्गानेही त्याचे रौद्ररूप दाखवायला सुरुवात केली आहे. असेच सुरु राहिल्यास निसर्गपुत्र म्हणवल्या गेलेला मनुष्य स्वहस्ते स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन होण्याचे काम करून होईल. किंबहुना तशीच सुरुवात झालेली आहेच!
मनुष्य कधीच निसर्गाच्या शक्तीला नाकारु शकत नाही. त्याने तसे समजणे, त्याचाच अंत घडवेल. असो ...
शेवटी मनुष्याच्याच हातात आहे का आनंदाने जगावे का कन्हतं मरावे...
महिमा वयाचा ...
जगात वेगवेगळ्या प्रकारांत फरक केले जातात. मुळात वयामुळे फरक करणे कधीकधी चुकीचेच ठरते. कारण बऱ्याचदा वाढतं वय समजदारी वाढवतंच असं नाही आणि कमी वय अल्लडपणा दाखवेलच असं नाही.
मोठ्यांचे जसे आपण आशिर्वाद घेतो तसेच लहानांच्या प्रेमाचीही तितकीच आवश्यकता असते. नाहीतर आपण एकीकडे आशीर्वाद घेत राहत, दुसरीकडे लहानग्यांना त्रास देऊन तेच आशिर्वाद संपवत असतो. मग आयुष्याची 'बॅलन्स शीट' वाढेल कशी ? ती तर रिकामीच राहणार !
ज्याप्रमाणे थोरले 'आशिर्वाद' देऊन आपल्या पुण्याईच्या 'बॅलन्स शीट' मध्ये 'क्रेडिट' वाढवत ठेवतात, त्याचप्रमाणे धाकटे 'दुआँ' देऊन त्यात 'बरकत' करत असतात. त्यांचे प्रेम, आपुलकीची सर या मजा काही औरच ...
बरे असेही नाही कि थोरले बऱ्याचदा शहाणे असतील. किंबहुना याबाबतीत धाकट्यांना मानावे लागेल. 'हुकूम मेरे आका' म्हणत सगळ्या जबाबदाऱ्या तेही लिलया पार पाडत असतात. एक विचार करा, जर त्यांनीच जबाबदारीचे पालन केले नाही तर ? धाकटेपणाचा विट त्यांनाही येत असेल हो ! असो, वयाच्या बाबतीतही एकप्रकारे विचार परिवर्तन होणे आवश्यकचं आहे कारण बऱ्याच जणांना यामुळे मोठेच होता येत नाही.
अजिंठा . . . अजिंठा, तसाच हतबल, अबोल, तितकाच कठोर दिसणारा पण मनाने तितकाच मृदु, तितकाच देखणा, तितकाच अनुभवी, तितकाच पूर्ण व तितकाच अतृप्त...