साहित्य
'साहित्य ' हे अजाण सौंदर्य आहे . त्याला तोलून मोलून चाळत यायचे नाही . किंबहुना ते गणितासारखे ठराविक उत्तर काढणारे शास्त्र तर नाहीच नाही , त्याची स्वतःची अशी एक आगळीवेगळी ओळख आहे . त्यात जर ठराविकपणा आला , तर ते साहित्य कसे ?साहित्याचा उद्देश्य मानवाच्या उद्धारासाठी आहे . जगत तर मनुष्य आधीही होताच , पण साहित्याने त्याला एका प्राण्यापासून 'माणसाचा ' दर्जा दिला . त्याला मानवी मूल्य देऊन सुसंस्कृत बनविले . आणि आज त्याच साहित्याला बंदिस्त कक्षेत बघताना काळजी वाटते . कदाचित यामुळेच उच्चविद्याविभूषित असूनही ते हळवे , नाजूक कविमन हरपतंय . महत्वाचं म्हणजे Logical and Rational Thinking कडे कल वळल्यामुळे मुळात साहित्यात त्याचे मूळ गुणधर्म व वैशिष्ट्ये उरलीत कुठं ?
प्रत्येक गोष्ट मनुष्य स्वतःच्या मुठीत नाही घेऊ शकत . 'साहित्य ' हे त्यांपैकीच एक ...
Wow
ReplyDelete